top of page

Search Results

Search this site

83 results found with an empty search

  • लोणी येथील प्रवरा गर्ल्स स्कूलमध्ये ‘आदिवासी दिन’ उत्साहात साजरा

    प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची विद्यार्थिनींना ओळख व्हावी, तसेच निसर्गसंवर्धन, शांतता, सामाजिक मूल्ये आणि परंपरांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी नृत्ये, गीते तसेच पारंपरिक वेशभूषेचे आकर्षक सादरीकरण केले. या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील आणि शिक्षण विभागाच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे तसेच अतांत्रिक विभागाचे डॉ. प्रदीप दिघे सर यांनी शुभेच्छा दिल्या. लोणी केंद्रप्रमुख श्री. विठ्ठल रंधे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या, डॉ. रेणू पाटील व मान्यवर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जडणघडणीत दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि मौल्यवान वारसा जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध पारंपरिक नृत्ये, गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे वैविध्य आणि समृद्धता प्रभावीपणे अधोरेखित झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये विविध संस्कृतींबद्दल आदर, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे नियोजन सौ. शितल थोरात व सौ.स्वाती वाघमारे यांच्याबरोबर त्यांच्या कुलप्रतिनिधी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या श्री . बाळासाहेब गायकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे आभार मानले.

  • हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष! मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान!

    कॅलिफोर्निया, सॅन होजे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या दैदिप्यमान कलाप्रवासाबद्दल मानाचा ‘नाफा जीवन गौरव’ प्रदान करण्यात आला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद श्री. ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रोहिणी हट्टंगडी यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरु इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्माते यांना समर्पित केला. त्या म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे.” नाफाने दिलेल्या सुंदर कार्यक्रमासाठी त्यांनी अभिजित घोलप आणि नाफाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. ‘नाफा’ म्हणजे केवळ चित्रपट महोत्सव नव्हे, सांस्कृतिक जागर! अभिजित घोलप म्हणाले, “नाफा हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडविणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदापासून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे. मराठी भाषा-संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या या प्रवासात युवा पिढीही हिरिरीने सहभागी होत आहे. यापूर्वीचा नाफा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर व अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना देण्यात आला आहे. आज त्याच प्रभावळीतील रोहिणीताई हट्टंगडींचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा नाफासाठी अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या सहवासाने नाफाचे व्यासपीठ अधिक समृद्ध होत आहे.” रेड कार्पेटवर मराठी सेलिब्रिटींचा ‘स्वॅग’ रोहिणी हट्टंगडी, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, प्रसाद ओक, अजिंक्य देव, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, नागराज मंजुळे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि निर्माती मंजिरी ओक व गार्गी कुलकर्णी यांच्या आकर्षक रेड कार्पेट एन्ट्रीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कलाकारांच्या पेहरावात महाराष्ट्रीयन परंपरा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक ग्लोबल स्टाईलचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला. विशेष फोटोशूट आणि मीडिया लाऊंजमधील दिलखुलास संवादामुळे सोहळ्याची रंगत आणखी वाढली. यानिमित्त प्रथेनुसार आदल्यादिवशी 'नाफा' संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या घरी 'गाला डिनर'चे आयोजन करण्यात आले होते. या 'गाला डिनर'मध्ये मराठी कलावंतांसह अमेरिकेतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. सॅन होजे येथील California Theatre मध्ये तीन दिवस रंगणाऱ्या 'नाफा महोत्सवा'च्या पुढील दोन दिवसांत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व मनोरंजक कार्यक्रमांसह अनेक चित्रपट आणि लघुपटांचे वर्ल्ड प्रीमिअर व विशेष स्क्रीनिंग होणार आहेत. हॉलिवूडच्या पंढरीत मराठी सिनेमाचा झेंडा आणि मराठी संस्कृतीचा जागर घडविणारा ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६’चा हा दिमाखदार सोहळा जागतिक मराठी समुदायासाठी निश्चितच अभिमानाचा ठरत आहे. प्रसिद्धी व जनसंपर्क : राम कोंडीलकर (राम पब्लिसिटी) मो. / व्हॉट्सअॅप : 9821498658 / 8080822385

  • नेपाळचे पहिले व माजी राष्ट्रपती डॉ. राम बरन यादव यांचे ऐतिहासिक आशीर्वाद

    नेपाळचे पहिले व माजी राष्ट्रपती Dr. Ram Baran Yadav यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा सन्मान लाभला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी घटना ठरली. या भेटीदरम्यान त्यांनी माझ्या शैक्षणिक कार्याचा, संशोधनातील योगदानाचा आणि विविध शैक्षणिक उपलब्धींचा गौरव करत भारत-नेपाळ शैक्षणिक व संशोधनात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः नेपाळमधील विद्यापीठांशी ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात अधिक व्यापक सहकार्य निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले. या संस्मरणीय भेटीतील सर्वात भावनिक आणि अनमोल क्षण म्हणजे त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मला आशीर्वाद लिहून दिले. हा केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी प्रेरणा आणि अमूल्य आठवण आहे. काही दिवस हे केवळ दिनदर्शिकेतील दिवस नसतात; ते आयुष्याच्या प्रवासातील महत्त्वाचे मैलाचे दगड ठरतात. आजचा दिवस माझ्यासाठी तसाच अविस्मरणीय ठरला. कृतज्ञ. नम्र. आणि शिक्षण, संशोधन तसेच मानवतेच्या सेवेसाठी अधिक समर्पित होण्याची नवी ऊर्जा देणारा.

  • डॉ. सायरस एस. पूनावाला स्कूलमध्ये अत्याधुनिक 'रोबोटिक्स लॅब' कार्यान्वित; कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार

    पुणे - डॉ. सायरस एस. पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल , रस्ता पेठ पुणे येथे ओमोटेक कंपनी मार्फत रोबोटिक लॅबोरेटरी चे पूर्ण सेटअप पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी बक्षीस पात्र स्वरुपात प्रधान करण्यात आले . सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थी हा या तंत्रज्ञानाशी जोडलेला असावा या उदेशाने ही रोबोटिक प्रयोगशाळा ओमोटेक कंपनीचे सस्थापक व कार्यकारी अधक्ष्य श्री शेखर जैन व त्यांच्या सुविध्य पत्नी रितू जैन यांनी हा निर्णय घेतला . समाजातील अत्यंत तळागाळातील मुलांना याचा लाभ व्हावा हा या मागचा एक मोठा उदेश आहे. कार्यक्रमामध्ये एड्यूड्रोन या शैक्षणिक फोरम च्या संस्थापक सौ. काजल छातीजा यांचे मोठे योगदान आहे , त्यांनी मुखधापिका सौ. माधुरी चोळके यांच्याशी संवाद साधून, विद्यार्थ्यांची संख्या व रोबोटिकची उपलब्धता व गरज बघून इयत्ता नर्सरी ते 7 वीच्या १४०० विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची उपलब्धता करून दिली. यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री वालचंद संचेती, कैंप एजुकेशन सोसायटीच्या मैनेजिंग कमिटी चे सदस्य व शाळेचे सचिव माननीय सुभाष अग्रवाल तसेच माननीय इम्तियाज मुल्ला, हे मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य निकुंब सर , सुनीता जैन , नीलिमा जाधव , काजल सोमाई यांनीही उपक्रमाची कौतुक केले.

  • मराठी भाषा गौरव दिन : भाषा की फक्त माध्यम, की एक सजीव चेतना? : Dr.Pratik Mungekar FRSA

    २७ फेब्रुवारी — हा दिवस फक्त एका कवीच्या जन्मदिनाचा स्मरणदिन नाही; हा दिवस आहे आपल्या विचारांची, संस्कृतीची, ओळखीची आणि आत्म्याची भाषा साजरी करण्याचा. हा दिवस साजरा केला जातो कारण तो महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी येतो. पण आज आपण मराठी भाषा गौरव दिनाकडे एका नव्या, कदाचित कधीही न ऐकलेल्या दृष्टिकोनातून पाहूया. १️ मराठी – संवादाचे साधन की विचारांची प्रयोगशाळा? आपण अनेकदा म्हणतो, "मराठी ही आपली मातृभाषा आहे." पण मातृभाषा म्हणजे नेमके काय? मराठी ही फक्त शब्दांची माळ नाही; ती विचारांची प्रयोगशाळा आहे. ज्या भाषेत आपण स्वप्न पाहतो, रडतो, हसतो, प्रेम करतो, रागावतो — ती भाषा आपल्या मेंदूच्या सर्वात खोल स्तराशी जोडलेली असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले, तर मातृभाषेत विचार करताना मेंदूची प्रक्रिया अधिक सखोल आणि सर्जनशील असते. म्हणून मराठी ही केवळ “बोलण्याची भाषा” नाही, ती निर्मितीची भाषा आहे. २️ मराठी – संस्कृतीची डीएनए कोड जसा प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो, तसाच प्रत्येक समाजाचा भाषिक डीएनए वेगळा असतो. मराठी भाषेत “माय”, “आपुलकी”, “सहवास”, “स्नेह”, “जिव्हाळा” असे शब्द आहेत — जे इतर भाषांमध्ये पूर्णपणे भाषांतरित करता येत नाहीत. याचा अर्थ काय? मराठी ही आपली सांस्कृतिक स्मृती आहे. छत्रपतींच्या रणगर्जना, संतांची अभंगवाणी, शाहिरांच्या पोवाड्यांची ज्वाला — हे सर्व मराठीतूनच अमर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची घोषणा मराठीतूनच लोकांच्या हृदयात पोहोचली. भाषा म्हणजे इतिहासाची वाहक. ३️ मराठी – आधुनिकतेची शत्रू की साथीदार? आजच्या डिजिटल युगात काहींना वाटते की इंग्रजीशिवाय प्रगती शक्य नाही. पण हा एक गैरसमज आहे. जगातील प्रगत देश जसे जपान, जर्मनी, फ्रान्स — हे सर्व देश आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण आणि संशोधन करतात. मग मराठी का नाही? आज AI, तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता — सर्व क्षेत्रात मराठीचा वापर होऊ शकतो. प्रश्न भाषेचा नाही, आपल्या दृष्टिकोनाचा आहे. ४️ मराठी – भावनांची अर्थव्यवस्था आपण अर्थव्यवस्था GDP मध्ये मोजतो. पण भावनांची अर्थव्यवस्था कशात मोजणार? जेव्हा आई म्हणते, "बाळा, काळजी घे," तेव्हा त्या वाक्याची किंमत किती? जेव्हा शिक्षक म्हणतात, "तू करू शकतोस," तेव्हा त्या विश्वासाची किंमत किती? मराठी ही भावनांची अर्थव्यवस्था चालवते. ती नात्यांची चलन आहे. ५️ मराठी – जागतिक होण्याची ताकद मराठी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. जगभरातील मराठी मंडळे, साहित्य संमेलने, संशोधन परिषदांमधून मराठीचा जागतिक विस्तार होत आहे. भाषेचा गौरव म्हणजे तिचा वापर वाढवणे — लेखनात, संशोधनात, विज्ञानात, स्टार्टअपमध्ये. मराठी ही स्थानिक नाही; ती ग्लोबल लोकल आहे. ६️ आजचा संकल्प – मराठी जगवायची नाही, जगवायची आहे! मराठी भाषा गौरव दिन हा केवळ “कार्यक्रम” नाही; तो एक चळवळ आहे. मराठीत विचार करणे मराठीत संशोधन करणे मराठीत तंत्रज्ञान निर्माण करणे मराठीत अभिमानाने बोलणे भाषा जपली जात नाही — ती जगली जाते. मराठीचा गौरव घोषणांनी नाही, कृतीने होतो. आजच्या दिवशी आपण ठरवूया — मराठीला फक्त "मातृभाषा" म्हणून नाही, तर "भविष्यभाषा" म्हणून स्वीकारूया. जय महाराष्ट्र! जय मराठी!

  • स्वप्नातून साकारलेली कला : माझा पाच वर्षांचा सांस्कृतिक प्रवास: उल्का देवऱुखकर

    आदिवासी पाड्यांमधून भटकताना त्यांच्या जीवनातील संघर्ष मी जवळून पाहिले. मात्र सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या कलेला मिळणारे शून्य मूल्य. पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला, निसर्गाशी जोडलेली सर्जनशीलता, ओळख नसल्यामुळे हळूहळू लुप्त होत चालली होती. त्या काळात मी एका पारंपरिक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक स्वप्न सतत आकार घेत होते या कलाकारांना रोजगार देण्याचे, त्यांच्या कलेला टिकवण्याचे आणि सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे. २०१९ मध्ये कोरोना महामारीने सगळं जग थांबवलं, पण माझ्यासाठी तेच परिवर्तनाचं वळण ठरलं. कलेप्रती असलेली माझी निष्ठा, सातत्य आणि समर्पण पाहून वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून मला स्वतःचा कला-आधारित व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. ते स्वप्न वास्तवात उतरू लागलं. यानंतर मी विविध महाविद्यालये, शाळा, अल्युम्नी प्लॅटफॉर्म्स आणि इंटर्नशिप कार्यक्रमांमध्ये कार्यशाळा घेतल्या. आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, तसेच दिव्यांग मुलांसाठी मानसिक आरोग्य व सर्जनशील अभिव्यक्तीच्या कार्यशाळा राबवल्या. या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू एकच होता—कला, संस्कृती आणि वारसा. राज्यस्तरीय प्रदर्शनं, लोककलेवर आधारित फॅशन शो, सांस्कृतिक उपक्रम यांमधून माझ्या कामाला व्यापक व्यासपीठ मिळालं. अनेक मानाचे पुरस्कार लाभले, पण सामान्य माणसांची दाद हीच खरी प्रेरणा ठरली. प्रवासाने मला खूप काही शिकवलं. चढ-उतारांनी खंबीर केलं. माझी टीम, विशेषतः आदिवासी महिला कलाकारांचा विश्वास आणि साथ, माझा आत्मविश्वास वाढवत राहिली. हळूहळू आमचं काम देशातील विविध राज्यांत पोहोचलं आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारलं. आज आमचं कार्यशाळा केंद्र हेच आमच्या तत्त्वज्ञानाचं प्रतीक आहे— जुन्या काळातील मातीच्या घराच्या संकल्पनेत उभारलेलं, जिथे कला निर्माण केली जात नाही, तर जगली जाते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी येथे आदिवासी जीवनशैली व निसर्गअभ्यासासाठी भेट देतात आणि जिवंत परंपरेचा अनुभव घेतात. एक कलाकार आणि म्युझ म्हणून मला एक वेगळी ओळख मिळाली. माझा विश्वास एकच होता स्वतःला कला बनवायचं. त्या विचाराने माझं आयुष्य बदललं. विविध कलाकारांनी माझी व्यक्तिचित्रं साकारली. ललित कला अकादमी, जहांगीर आर्ट गॅलरी यांसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठांवर तसेच सोशल मीडियावर माझी प्रतिमा कलेच्या रूपात मांडली गेली. आजवर १५० हून अधिक कलाकारांनी माझी व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत ती केवळ माझी प्रतिमा नसून, वारसा, शक्ती आणि कलेप्रती निष्ठेची कथा आहे. माझ्या छायाचित्रणाने मला आणखी एक ओळख दिली हिरकणी, सातारा यांची ब्रँड अँबेसॅडर म्हणून आणि त्यानंतर ओडिशा संस्कृती व वारसा राजदूत म्हणून निवड झाली ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज पाच वर्षांचा हा प्रवास मागे वळून पाहताना, तो स्वप्नवत वाटतो. कठोर परिश्रम, श्रद्धा, संघर्ष, अभिमान आणि उद्देश यांनी घडलेला हा प्रवास आहे. आदिवासी पाड्यांतून उमललेलं एक शांत स्वप्न आज एका जिवंत चळवळीत रूपांतरित झालं आहे जिथे कला जपली जाते, संस्कृती सन्मानाने उभी राहते आणि माणसं आत्मसन्मानाने जगतात. हा केवळ माझा प्रवास नाही. ही कलेने आपलं स्थान पुन्हा मिळवण्याची कहाणी आहे. उल्का देवऱुखकर संस्थापक – कारीगर सांस्कृतिक राजदूत – ORRA, ओडिशा

  • शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात ‘Film Making पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन

    शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात IQAC, बँकिंग अँड इन्शुरन्स तसेच अकाउंटिंग अँड फायनान्स विभागांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी ‘चित्रपट निर्मिती (Film Making)’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये माध्यम साक्षरता, सर्जनशीलता तसेच डिजिटल युगातील दृकश्राव्य माध्यमांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अनिल सिंह यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आजच्या स्पर्धात्मक व डिजिटल युगात मीडिया, फिल्म मेकिंग, जाहिरात व कंटेंट निर्मिती या क्षेत्रांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. चित्रपट निर्मिती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, तांत्रिक कौशल्ये, संघभावना, नेतृत्वगुण व संवादकौशल्य विकसित होते. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भविष्यातील करिअरसाठी अधिक सक्षम होतात व आत्मविश्वासाने आपले विचार मांडण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘Smaster_Ji Production’ चे संस्थापक श्री. सुनील वाघमारे उपस्थित होते. त्यांनी ‘Film Making पाठशाळा’ या संकल्पनेचे सखोल व सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले. व्हिडिओ निर्मितीची प्रक्रिया, कॅमेऱ्याचे प्रकार, प्रकाशयोजना, कॅमेरा अँगल्स, स्क्रिप्ट लेखन, दिग्दर्शन तसेच संपादन (एडिटिंग) याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांची तांत्रिक व कलात्मक बाजू प्रभावीपणे समजावून सांगितली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी मीडिया व फिल्म क्षेत्रातील करिअर संधींबाबत विविध प्रश्न विचारले. त्यास श्री. सुनील वाघमारे यांनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून नव्या कौशल्यांची ओळख झाली, अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष गायकवाड, IQAC समन्वयक प्रो. डॉ. एस. एस. वाघमोडे, बँकिंग अँड इन्शुरन्स विभागप्रमुख, अकाउंटिंग अँड फायनान्स विभागप्रमुख प्रा. यास्मिन शेख, प्रा. राजेंद्र दिवेकर, प्रा. दर्शना निचिते, प्रा. नयना जाधव, प्रा. निशा वर्मा तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र दिवेकर यांनी केले, सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी तन्वी वारघाडे हिने केले तर आभारप्रदर्शन प्रा. यास्मिन शेख यांनी केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे महाविद्यालयाची शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

  • राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

    प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे दि. १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये या थोर विभूतींचे विचार, आदर्श व मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयश्री सिंगार मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत पुष्परोप भेट देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन सौ. सायराबानू शेख यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सात्रळ येथील उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून शिस्त, धैर्य, आत्मविश्वास व राष्ट्रसेवा या मूल्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या माननीय प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विवेकानंदांचा मौलिक विचार "उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका", ही आत्मसात करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचा समारोप सौ. खालकर यांच्या आभारप्रदर्शनाने करण्यात आला.या युथ क्लबच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवानंद हिरेमठ अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, माध्यमिक शिक्षण विभाग संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्या डॉ. रेणू पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमास हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या.

  • ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृतीचा सूर समता विद्यालय, उरुळी देवाची येथे निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनची प्रभावी कार्यशाळा

    उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) — साने गुरुजी शिक्षण संस्थेचे समता विद्यालय, उरुळी देवाची येथे दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने ध्वनी प्रदूषण जनजागृती कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या पर्यावरण संवर्धनविषयक कार्याचा आढावा घेतला. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्य, विद्यार्थी जीवन आणि समाजावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी डॉ. गरिमा कवठेकर, संस्थापक व संचालिका यांचा परिचय करून देत, नववर्षात संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शन डॉ. गरिमा कवठेकर यांनी केले. त्यांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील मूलभूत संकल्पना, डेसिबल म्हणजे काय, डेसिबल मीटरचा वापर, ध्वनी प्रदूषणाची कारणे व त्याचे दुष्परिणाम यांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांसह दिली. टाळ्या कशा वाजवाव्यात, शिट्टी न वाजवता बोटांच्या साहाय्याने कमी आवाज कसा निर्माण करता येतो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (डेमो) सादर करून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात ध्वनी प्रदूषण कसे टाळता येईल, याचे प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात व कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेले उत्स्फूर्त सहकार्य उल्लेखनीय ठरले. विद्यार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे यांनी डॉ. गरिमा कवठेकर यांच्या कार्याची प्रशंसा करत, समाजात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृती घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास श्री. ऋषिकांत भोसले (पर्यवेक्षक), श्री. नाना झाबरे, श्री. शरद मोरे, महिला शिक्षिका, सेवक वर्गातील श्री. भोकसे, श्री. मेमाणे, श्री. टेले, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे, तसेच निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य श्री. गणपती खोत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री. सदानंद नरुटे (कला शिक्षक) यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे व पर्यवेक्षक श्री. ऋषिकांत भोसले यांच्या हस्ते निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनच्या टीम सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांसाठी संस्थेला पुनःपुन्हा आमंत्रित करण्याची इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशस्वी कार्यशाळेत सुमारे ९०० विद्यार्थी तसेच २० शिक्षक व सेवक वर्ग सहभागी झाले होते. सदर ध्वनी प्रदूषण जनजागृती कार्यशाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे यांच्या परवानगीमुळेच यशस्वीपणे पार पडली.

  • स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा

    १५ ऑगस्ट २०२५, पुणे हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील सुवर्णदिन असून, १९४७ साली भारताने ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य संपादन केले. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे आणि सौ. यशश्विनी भिलारे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना स्वातंत्र्यदिनाचे राष्ट्रभावनेतील महत्त्व अधोरेखित केले. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्काऊट आणि गाईड पथकाच्या संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीत, नृत्य, आणि नाट्यछटा सादर करून स्वातंत्र्याचा संदेश प्रभावीपणे मांडला. कार्यक्रमादरम्यान, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान-गणित ऑलिम्पियाडमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थितीसाठी आभार मानत देशप्रेम आणि नागरिकत्वाच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. हा स्वातंत्र्यदिन सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, तसेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि कर्तव्यभावनेबद्दलची जाण अधिक दृढ झाली.

  • ‘रक्षकांना राखी’ : हेरिटेज स्कूलचा अनोखा रक्षाबंधन सोहळा

    पौड, ता. पुणे – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन यंदा हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलने अनोख्या उपक्रमातून साजरा केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पौड पोलिस स्टेशनला भेट देऊन समाजाचे खरे ‘रक्षक’ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांचा सन्मान केला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेने पोलीस स्टेशनला भेट देऊन विद्यार्थ्यांना कायदा अंमलबजावणी, फौजदारी न्यायव्यवस्था आणि समाजरक्षण याबाबत प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी विविध विभागांची पाहणी केली, एफआयआर नोंदणीची प्रक्रिया शिकलो, तसेच गुन्हेगारी प्रतिबंधक उपायांबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस अधिकारी श्रीमती अनिता रवळेकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री. मनोज कदम, श्री. वैभव सुरवसे, श्री. मंगेश कदम, श्री. निवास जगदाळे, श्री. श्रीकृष्ण पोरे, श्री. बाबा पाटील, श्री. संतोष गायकवाड आणि श्री. विजय ओंबासे यांची विद्यार्थ्यांशी उत्स्फूर्त चर्चा झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुळशी तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे यांना भेटण्याची संधीही मिळाली. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी क्षण सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रक्षाबंधनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ आनंदोत्सव नव्हता, तर एक मौल्यवान शिकण्याचा अनुभव ठरला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव श्रीमती संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे आणि श्रीमती यशस्विनी भिलारे यांनी पोलिस विभागाच्या नि:स्वार्थ सेवेसाठी आणि समाजरक्षणासाठी मनःपूर्वक आभार मानले.

  • तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव ओतूर येथे उत्साहात संपन्न

    'तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव २०२५' व 'पुस्तक प्रकाशन सोहळा' अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन मा. जि. प. सदस्य मोहितशेठ ढमाले व मा. जि. प. सदस्य अंकुशशेठ आमले यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून व वृक्ष पूजन करून केले. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे आणि ओतूरच्या सरपंच डॉ. छाया तांबे उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिज्ञा वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अण्णासाहेब वाघिरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक राजेश साबळे यांनी तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी मनोगत प्रा. सुरेश डुंबरे यांनी व्यक्त केले . याप्रसंगी करंजाळे, ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांचे वाचन केले. काव्य सादरीकरणामध्ये राज्यभरातील १०० कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. उत्तम सदाकाळ, यशवंत घोडे व शोभा गवांदे या ज्येष्ठ साहित्यिकांनी काव्य वाचन स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांमधून सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या व सहभागी साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्ती महाराज कानवडे, संगमनेर (प्रथम), गौतम वाघमारे, संगमनेर (द्वितीय), शब्द स्वरा मंगरूळकर, मंगरूळ पारगाव, पुणे (तृतीय), नवनाथ सरोदे आंबी दुमाला, संगमनेर (चतुर्थ) आणि देवेंद्र गावंडे, जि. अकोला (पाचवा) हे काव्य स्पर्धेचे विजेते ठरले. या काव्य महोत्सवात राजेश साबळे यांच्या 'अस्तित्व,' प्रा. सुरेश डुंबरे यांच्या 'वेदनेच्या गर्भकळीतून,' डॉ. प्रवीण डुंबरे यांच्या 'उनाड पाऊस' व महोत्सव समितीच्या 'श्रावणधारा भाग - २' या काव्य संग्रहांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजेश साबळे ओतूरकर, डॉ. खं. र. माळवे, प्रा. सुरेश गे. डुंबरे, डॉ. प्रवीण डुंबरे हे जेष्ठ साहित्यिक उपस्थित होते. संजय गवांदे, प्रा. नागेश हूलवळे यांनी या संपूर्ण काव्य महोत्सवाचे निवेदन केले. विश्वविक्रमी रांगोळीकार सौ. हर्षा काळे यांच्या मनोवेधक रांगोळीने महोत्सवासाठी आलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रणजित पवार यांनी आलेल्या सर्व साहित्यिकांचे आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page